उस्मानाबाद – पावसांने दांडी मारल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांने दहा एकर उडिदावर नांगर फिरवला आहे. या भागात पावसाने विश्रांती घेतल्याने पिक करपत जात आहेत. तर शेतकऱ्यांना उभा पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.
कल्याणी घोडके असे या शेतकऱ्याचे नाव असून तब्बल दहा एकर क्षेत्रावरील उडीद पीक जमीनदोस्त केला आहे. उडिद हे नगदी पिक म्हणून ओळखले जाते मात्र पावसाने दांडी मारल्यामुळे येथील शेतकऱ्यांना अशा पिकांना मुकावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या भागातील जवळपास सर्वाच पिकांची परिस्थिती अशीच असल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकरी व शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. कृषी मंत्र्यांनी या नुकसान भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याची मागणी स्थानिक राजकारणी करत आहेत. अन्यथा कृषी मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेकडून देण्यात येतो आहे.