मुंबई – मुंबईच्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली 40 ते 45 जण अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं ही प्राथमिकता आहे. तसेच सगळी योग्य माहिती घेऊन त्यानंतर मदतीसंदर्भातली घोषणा केली जाईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis on Dongri building collapse: As per the initial information I have received, around 15 families are feared trapped in the collapse. The building is around 100 yrs old. The entire focus is on rescuing the people trapped. Investigation will be done. pic.twitter.com/ApIVqmNLMb
— ANI (@ANI) July 16, 2019
दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून एनडीआरएफचे जवानदेखील घटनास्थळी पोहचले आहेत. या इमारतीत 10 ते 15 कुटुंब राहत होती. चिंचोळ्या गल्ल्या आणि गर्दीच्या परिसरामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. तरीही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.