मुंबई -मुंबई – मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेलं पत्र आणि त्या पत्राला ठाकरेंनी दिलेलं उत्तर यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता याप्रकरणावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून या ट्विटमध्ये त्यांनी २०१५ मधील ‘द क्विंट’च्या एका लेखाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.
Don’t u want to reply to this too .. Mr CM ?
Or it’s just pure politics as usual ?
Sort out ur own house first before blaming others!!! pic.twitter.com/h6EZ6RFnLG— nitesh rane (@NiteshNRane) October 14, 2020
काय म्हणाले नितेश राणे
“धर्मनिरपेक्षता संपली आहे, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा” अशा मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या लेखात संजय राऊत यांचा उल्लेख आहे. नितेश राणे यांनी यावरुन उद्धव ठाकरेंना यावर तुम्ही प्रत्युत्तर देऊ इच्छित नाही का ? अशी विचारणा केली.
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “यावरही उत्तर द्यावं असं वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होतं? इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा” अशी टीका त्यांनी केली आहे.