मुंबई: आत्ता मला राजकारणात जायचं नाही. सध्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. काल जो वादळी पाऊस झाला त्याच्यासमोर जगात कुणीही उभं राहू शकत नाही. असं असतानाही मुंबई पुन्हा रस्त्यावर आली आहे. आपण काम करतो आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
सध्यातरी इथं काही मदत करता येईल का याची पाहणी सुरु आहे. जागतिक हवामान बदल हे सत्य आहे आणि हा जगाला इशारा आहे. आता आपण ते स्वीकारुनच पुढील नियोजन करायला हवे. विरोधकांचे आरोप हास्यास्पद असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईत नालेसफाई नव्हे, तर हातसफाई – देवेंद्र फडणवीस
दरवर्षी मुंबईमध्ये पाऊस पडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते ती सुधारलेली कुठेही दिसत नाही. ज्याप्रकारे मुंबईमध्ये पाणी जमा झाले आणि एनडीआरएफला लोकांना बाहेर काढावे लागले. ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे.
बीएमसी कायमच नालेसफाई झाल्याचा दावा करते. पण ती पूर्ण झालेली नाहीत. मी म्हणेन की 113 टक्के नालेसफाई ही फक्त सफाई आहे. ती कुठली सफाई हे तुमच्या लक्षात येते, असा टोला त्यांनी लगाविला.