मुंबई – मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेत 4 मेपासून आपला कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचा इशारा दिला. तसेच हिंदूंनी जिथे बांग सुरू असेल तिथं हनुमान चालिसा लावावी, अस राज ठाकरे म्हणाले. मात्र आता राज ठाकरेंच्या या भूमिकेला हिंदू संघटना आणि ब्राह्मण महासंघाकडून विरोध होतोय.
ब्राह्मण आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले की, मशिदींचा भोंगा काही कालावधीसाठी असतो. मात्र हिंदुंचे सण वर्षभर चालत असतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेचा पुन्हा एकदा विचार करावा.
दवे पुढं म्हणाले की, मशिदींवरील भोंगे उतरविल्यानंतर हिंदूंच्या सणांचे काय करायचे. रस्त्यावर नमाज पठण करणं चुकीचं आहे. पण मग गणपती, दांडिया, दहिहंडी हे उत्सव रस्त्यावरच होतात. मिरवणूक, दांडियांचे काय करणार असे प्रश्न दवे यांनी उपस्थित केले.
दरम्यान भोंगे उतरवणे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही शक्य झालं नाही. भोंगे उतरविल्याने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचेच होणार असल्याचं मतही दवे यांनी मांडलं.