भाजप प्रवक्ता प्रेम शुक्ला यांचा आरोप
नवी दिल्ली : बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शक अनुराग कश्यप नेहमी भाजप सरकारविरोधात आंदोलन करण्यात अग्रेसर असतात. मोदी सरकारविरोधक अशीच त्यांची ओळख आहे. सोशल मीडियावरही सरकारविरोधात ते सातत्याने पोस्ट करत असतात. आता भाजपने त्यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमधील तत्कालीन अखिलेश सरकारने कश्यप यांना मसान चित्रपट निर्मितीसाठी 2 कोटी रुपये दिले होते. आता अशीच रक्कम कश्यप हे सांड की आंख आणि मुक्केबाजसाठी मागत असल्याचा आरोप भाजपने केली आहे.
. @anuragkashyap72 got 2 cr from Akhilesh Yadav for his film Masaan. He wants similar amounts for his other films like Mukkabaz and Sand Ki Ankh, which the current UP government is still evaluating. That perhaps explains his tirade against BJP and Modi government. pic.twitter.com/BD0UGJ9KnB
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) January 11, 2020
भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले की, अनुराग कश्यप यांच्या मोदी द्वेषाचे कारण आता समोर आले आहे. अनुराग हे असेच पैसे गोळा करतात, असेही त्यांनी म्हटले याबाबत भाजपने तीन पानांचे पत्र जारी केले आहे. हे पत्र सदस्य सचिव, माहिती आणि संपर्क विभाग, उत्तर प्रदेशचे आहे. पहिल्या पत्रात स्पष्टपण लिहिले आहे की, अनुराग कश्यप यांच्या 11 डिसेंबर 2014 च्या पत्राच्या उत्तरादाखल उत्तर प्रदेशच्या माहिती संपर्क विभागाने 1 मार्च 2015 रोजी 2 कोटी रुपये देण्याची शिफारस केली आहे.
पत्रात लिहिले आहे की, मसान चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकूण 8 कोटी रुपये खर्च आला. चित्रपटाचे 97 टक्के छायाचित्रण हे उत्तर प्रदेशात झाले. यासाठी उत्तर प्रदेशच्या माहिती विभागाने चित्रपट धोरणानुसार चित्रपटाच्या एकूण खर्चाच्या 25 टक्के रक्कम दिली. सांड की आंख चित्रपटाच्या संदर्भात अनुराग कश्यप यांच्या अनुदान देण्याबाबतच्या पत्राचे उत्तर देताना माहिती आणि संपर्क विभागाने 28 सप्टेंबर 2018 मध्ये लिहिलेल्या पत्रात सरकारच्या चित्रपट धोरणानुसार आपला चित्रपट नसल्याचे स्पष्टपणे म्हटले होते.