मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसऱ्या दिवशी सभागृहात विरोधकांनी घोषणाबाजी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला नाही. शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत करा. शेतकऱ्यांचा साताबारा कोरा कधी करणार असा सवाल करीत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आगोदर शेतकऱ्यांनी चर्चा करा, महिला सुरक्षेवर सरकार बोलत नाही. सरकारने महिलांना न्याय द्यावा अशी मागणी विरोधी पक्षातर्फे करण्यात आली. सरकार महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतय, असा आरोप भाजच्या महिला आमदारांनी केला.
तसेच सरकारला काय अडचण आहे से स्प्ष्टपणे सांगावे. शेतकरी कर्जमाफीची यादी फसवी असल्याची टीका नितेश राणे यांनी केली. तुम्ही शेतकऱ्याला कैवारी म्हणता मग शेतकऱ्यांना दिलेला आश्वासन का पळत नाही असा सवाल नितेश राणी यांनी केला.