शेवगाव – पंचायत समितीने यंदाच्या उन्हाळ्यासाठी अवघा 13 लाखांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये विविध उपाययोजनांसह टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे केवळ दोन गावांना टॅंकर लागणार असल्याचे आराखड्यात म्हटले आहे.
टंचाई आराखड्यात पिण्याच्या पाण्यावर सुमारे 13 लाख रुपये खर्च गृहीत धरुन तालुक्यातील नागलवाडी व सोनविहीर या दोन गावांसाठी टॅकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आल्यास एक टॅंकर उपलब्ध करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 7 लाख रुपयांचा खर्च तसेच तालुक्यातील सोनविहीर, नागलवाडी, सेवानगर तांडा गावठान, गोळेगाव व सोनेसांगवी अशा सहा ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव केला आहे. त्यासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च तसेच शेवगाव, राक्षी व चापडगाव येथील उद्भवातून पाणी उचलून प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून समाविष्ट गावात पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी सुमारे 1 लाख 75 हजार असा एकूण 13 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सध्या पहाटे गारवा, तर दुपारी काही प्रमाणात उन्हाच्या झळा व संध्याकाळी पुन्हा गारठा असे दुहेरी वातावरण असते. त्यामुळे हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून पंचायत समितीच्या टंचाई विभागाने पाणी टंचाईचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पुढे पाठविला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून तालुक्यात पर्जन्यमान बऱ्यापैकी राहिल्याने पिण्याच्या पाण्याच्या सर्वच स्तोस्त्रात बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सहसा पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी आहे. पाच वर्षापूर्वी तालुक्यातील टंचाईग्रस्त 52 गावात 69 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागला व त्यासाठी शासनाच्या तिजोरीतून सुमारे 10 ते 11 कोटी रुपये खर्ची पडले. मात्र सन 2020-2021 व त्यापाठोपाठ व 2021 -2022 मध्ये टॅंकर संख्या निरंक राहिली आहे. या काळात तालुक्यात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी राहिल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. गावागावात बंद असणारे हातपंप व विहिरी पुर्नजीवित झाल्या. नदीवरील विविध बंधारे तुडुंब भरले.
शासनाच्या जलजीवन योजनेतून तालुक्यात विविध ठिकाणी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना झाल्या. तालुक्याची जीवन रेखा म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी जलाशयात जवळपास 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्याने प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या तालुक्यातील लाभधारक गावांना मुबलक पाणी मिळत आहे. पिण्याच्या पाण्याची अडचण कमी झाली आहे.त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्यासाठी पूर्वी शासकीय तिजोरीवर पडणारा कोट्यवधीचा खर्च आता काही लाखावर येणार आहे. एकांदरीत शासन,प्रशासन व विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणारतालुक्यात सन 2015-16 मध्ये टंचाईग्रस्त 52 गावे 69 टॅंकर, खर्च सुमारे 10 कोटी, सन 2016-17 टंचाईग्रस्त 6 गावे 9 टॅंकर खर्च 9 लाख, सन 2018-2019 टंचाईग्रस्त 50 गावे 69 टॅंकर खर्च 12 कोटी, 2019-2020 टंचाईग्रस्त 3 गावे 4 टॅकर, खर्च 7 लाख, सन 2017-18, 2020-2021 व 2021-22 मध्ये एकाही गावात पाण्याची टंचाई नव्हती. टॅंकर संख्या निरंक. नाही. हे तालुका पंचायत समितीच्या टंचाई आराखड्यातून स्पष्ट होत आहे.
दहा टक्क्यांपर्यंत
तालुक्यात सन 2015-16 मध्ये टंचाईग्रस्त 52 गावे 69 टॅंकर, खर्च सुमारे 10 कोटी, सन 2016-17 टंचाईग्रस्त 6 गावे 9 टॅंकर खर्च 9 लाख, सन 2018-2019 टंचाईग्रस्त 50 गावे 69 टॅंकर खर्च 12 कोटी, 2019-2020 टंचाईग्रस्त 3 गावे 4 टॅकर, खर्च 7 लाख, सन 2017-18, 2020-2021 व 2021-22 मध्ये एकाही गावात पाण्याची टंचाई नव्हती. टॅंकर संख्या निरंक.