मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात थैमान माजला आहे. बेडसाठी रुग्ण आणि नातेवाईकांचे अतोनात हाल होत असून, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही ऑक्सिजन व इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे. ऑक्सिजन अभावी अनेक राज्यामध्ये झालेल्या घटनांनी आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडेच काढले असून, ब्रिटनमधील एका इंग्रजी वर्तमानत्तपत्राने करोनाने भारताचा नरक केल्याचं म्हटलं आहे. याच मुद्यावरूनज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या केंद्र सरकारवर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले कपिल सिब्बल
‘भारतात मार्च महिन्यात नवा विषाणू हा देशामध्ये अधिक वेगाने पसरेल आणि नवीन संकट निर्माण होईल. असा इशारा संशोधकांनी दिला होता. मात्र हि बाब मोदी सरकारने गांभीर्याने न घेता सरकारला आपण राजकीय सभा घेऊ शकतो आणि कुंभ मेळ्याचं आयोजन करु शकतो असं वाटलं. मोदी सरकारने ज्या प्रकारे कोविडच्या दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष केले त्यातून हे कळते की, साथीच्या रोगाची परिस्थिती कशी हाताळू नये हे समजते.पंतप्रधान मोदींनी देशवासियांसमोर आलं पाहिजे आणि देशाची माफी मागितली पाहिजे’