फडणवीसांनी केल्या जलयुक्त शिवार योजनेच्या फक्त वल्गना; प्रत्यक्षात कामे अत्यंत तकलादू
मुंबई: जलयुक्त शिवार योजनेचा राज्यात उडालेला फज्जा आणि कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी होणार आहे. मात्र राज्यातील जलसंधारणाची कामे सुरूच राहणार, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात जलसंधारणाच्या कामांना एकत्रितपणे जलयुक्त शिवार हे गोंडस नाव दिले गेले. जलयुक्त शिवारामुळे ७२ टीमसी पाणी अडवले गेले, अशा वल्गना देखील मागच्या सरकारने केल्या. पण, त्याही खऱ्या नव्हत्या. प्रत्यक्षात जलयुक्त शिवार योजनेत झालेली कामं अत्यंत तकलादू होती. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीपाठोपाठ आता जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी होणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.