मुंबई : एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे. आज हा शपथविधी संध्याकाळी ७:३० वाजता हा शपथविधी होणार आहे. मात्र हा शपथविधी अत्यंत साध्या पद्धतीने होणार आहे. असे स्पष्ट केले आहे. सध्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे कुणालाही आम्हाला शपथविधी करिता आमंत्रण देता येणार नाही त्याबद्दल खेद व्यक्त करतो. असे पत्रकार परिषदेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे हे मुंबईत आल्यानंतर शिवसैनिकांकडून गोंधळ निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र एकदम छोट्या पद्धतीने हा शपथविधी होणार आहे. त्याकरिता कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
नक्की काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
एकनाथ शिंदे मुख्यंमत्री होतील अशी माहिती माहिती आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दरम्यान दिली. तसेच आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा मुख्यमंत्री शपथविधी पार पडेल अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली आहे.
हा जनादेशाचा चा अपमान
२०१९ साली भाजप आणि शिवसेनेची युती होती यात ३७० लोकं निवडून आले होते. अपेक्षा होती भाजप आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होईल पण दुर्दैवाने त्या निवडणुकेचे निकाल आल्यानंतर शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला. आणि बाळासाहेबांनी आजन्म ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केली हा जनादेशाचा अपमान होता. असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.
ही महाराष्ट्रासाठी अत्यंत खेदजनक बाब
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केलेलं सरकार राज्यात निवडून आलं त्यानंतर प्रचंड भष्टाचार पाहायला मिळाला. महाराष्ट्राचे २ मंत्री भ्र्ष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत खेदजनक बाब होती. रोज सावरकरांचा अपमान होत होता. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते निर्णय घाईत झाले…
जोपर्यंत विश्वसामत होत नाही तोपर्यंत कॅबिनेटची मिटिंग घेणे हे नियमात नाही. मात्र तरीही कॅबिनेटची मिटिंग झाली. आणि मग जाताजाता संभाजीनगर, मग धाराशिव काय , दि बा . पाटील नामकरणाचे हे निर्णय झाले. अर्थात मग ते राज्यपालांचे निर्देश आल्यावरच का झाले ? आधी का झाले नाहीत असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. शिवाय नव्या सरकारात पुन्हा एका ते निर्णय घ्यावे लागतील असे फडणवीसांनी म्हंटले.
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मध्ये शिवसेनेच्या आमदारांची मोठी कुचंबणा झाली तेव्हा या सगळ्यांनी निर्णय घेतला काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत राहायचं नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीचीच कास धरली. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला त्यावर काही बोलायचं नाही . असे फडणवीस म्हणाले.
सत्तेकरता आम्ही काम करत नाही ही विचारांची लढाई आहे. म्हणून भाजपने एकनाथ शिंदे यांना साथ द्यायची ठरवली. आणि एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील. तसेच आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा मुख्यमंत्री शपथविधी पार पडेल अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली आहे.