अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी “आंदोलन रद्दबाबत’ केली टिप्पणी
पुणे – पुढील वर्षी राष्ट्रीय उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढ होईल असा दावा केला जात आहे. हा असा दावा कशाच्या आधारे केला जात आहे. देशातील जनतेची दिशाभूल केली जात आहे. केवळ घोषणांवर देश चालविण्याचा प्रयत्न केला जात आहेत, अशी टीका अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मोदी सरकारवर केली आहे.
राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त डॉ. मुणगेकर पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. मुणगेकर म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने 2016 मध्ये नोटाबंदी, त्यापाठोपाठ “जीएसटी’ लागू केला. तेंव्हापासून देशाची अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे, त्यातच करोनाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला असताना देशाचे “सकल राष्ट्रीय उत्पन्ना’त उणे असताना पुढील वर्षी (2021-22) त्यामध्ये 11 टक्क्यांनी वाढ होईल, असे बोलले जाते.
मात्र, हा चमत्कारी निष्कर्ष कोणत्या आधारावर केला जात आहे? देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी केंद्राने 20 वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातील केवळ दोन टक्के रक्कम नागरिकांसाठी होती, असे सांगत मुणगेकर म्हणाले की, रोजगार निर्मिती, शेती, उत्पादन क्षेत्रासाठी मोदी सरकारकडून गेल्या तीन वर्षात कोणताही प्रयत्न झालेला नाही, असे असताना पुढील वर्षी राष्ट्रीय उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढ कशी होईल? हा असा दावा कशाच्या आधारे केला जात आहे. देशातील जनतेची दिशाभूल केली जात आहे. केवळ घोषणांवर देश चालविण्याचा प्रयत्न केला जात आहेत.
मोदी सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही…
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू, अशी घोषणा मोदी सरकारने 2014 च्या निवडणुकीत केली होती. पण, आज शेतकऱ्यांचा मोदी सरकारवर विश्वास राहिलेला नाही. मोदी मात्र शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार नाही. स्वत:च्या प्रतिष्ठेपेक्षा जनतेची प्रतिष्ठ महत्वाची असते. असे स्पष्ट मत डॉ. मुणगेकर यांनी दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत व्यक्त केले.