नवी दिल्ली – केंद्र सरकारने लघु, सुक्ष्म आणि छोट्या उद्योगांना तीन लाख कोटी रूपयांचा पत पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण आत्तापर्यंत या क्षेत्राला यातील केवळ 65 टक्केच रकमेचा पुरवठा झाला असून ही योजना चालू महिन्यातच बंद होण्याची शक्यता आहे, कारण ऑक्टोबर महिन्यानंतर या योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधिन नाहीं असे सांगण्यात येत आहे.
करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे या कर्ज पुरवठ्याची योजना जाहींर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 25 कोटी रूपयांपर्यंत कर्ज घेण्याची मर्यादा होती ती 50 कोटींपर्यंत वाढवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 1 लाख 36 हजार कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. या योजनेची मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत आहे.