पुणे – मार्केट यार्डातील तरकारी विभागात बहुतांश पालेभाज्यांची मागील आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर आहे. मागणीच्या तुलनेत शेपू बाजारात दाखल होत असल्याने भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्याने घट झाली. तर, अंबाडी आणि चवळीच्या भावात किरकोळ घट झाली आहे. कांद्याचे दर वाढल्याने कांदापातीची आवक घटली आहे. परिणामी, कांदापातीच्या भावात वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.
कोथिंबिरीला घाऊक बाजारात 2 ते 5 रुपये भाव मिळत असून, किरकोळ बाजारात 5 ते 10 रुपये भावाने विक्री होत आहे.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : 200-500, मेथी : 300-500, शेपू : 500-700, कांदापात : 1200-1800, करडई : 600-800, पुदिना : 100-300, अंबाडी : 500-600, मुळे : 1000-1500, चुका : 600-800, चवळई : 500-700, पालक : 500-700.