बाजार समिती बंद; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद
नगर – कांद्याची निर्यात खुली करून त्यावरील निर्बंध हटावावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कडकडीत बंद ठेवून कांदा सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकार व राज्यसरकारचा जाहिर निषेध करण्यात आला. या आंदोलनात शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सरकार कोणतेही असो निवडणुका लागल्याकी शेतकऱ्यांचा बळी दिला जातो. आता ही प्रथा बंद झाली पाहिजे. शेतकऱ्याच्या मुळावर उठलेल्या या केंद्र व राज्य सरकारचा जाहिर निषेध करत कांदा संत्याग्रह शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला. गेल्या दोन चार वर्षापासून जिल्हात दुष्काळाच्या सावटा खाली शेतकरी जगत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा डोक्यावर कर्जाचा बोजा वाडतच चालला आहे. मात्र, भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली नाही. तसेच शेतमालाला हमी भाव दिला नाही. यंदा कांद्याला चांगला बाजार मिळत आहे तर त्यात शेतकरी विरोधी सरकारने निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करत असून राज्यात दोन टप्प्यात आंदोलन करण्यात येणार आहे.
कांदा निर्यात बंदी व साठ्यावरील मर्यादा घातल्यामुळे कांद्याचे दर कोसळले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना कांदा खरेदी करणे ही अशक्य झाले. घाऊक व्यापाऱ्याला पाचशे क्विंटलची मर्यादा घालणे म्हणजे कांदा व्यापाराचा अभ्यास नसणे होय. तसेच शेतकऱ्यांनी एक जूट होवून कांदा निर्यात बंदी उठविण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकावा. जो पर्यंत निर्यात खुली होत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.