अपघातांत वाढ होत असल्याने केली कारवाई : चालकांना जरब
शहरात रस्ते अपघातांची मोठ्या प्रमाणात वाढ
कोतवाली, भिंगार कॅम्प, तोफखाना पोलीसांची कारवाई
नगर – मद्यधुंद वाहन चालकांना जरब बसविण्यासाठी शहरातील चार पोलीस ठाण्याअंतर्गत अचानक संयुक्त कारवाई करत 1 हजार मद्यपींनवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरात अपघातांचे प्रमाणात वाढ झाली असल्याने, ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांनी सांगितले.
नगर शहरात रस्ते अपघातांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनास महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये अपघाताचे प्रमाण दहा टक्कांनी कमी करण्यासाठी उपाय योजना राबविण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस दलाकडुन प्रयत्न सुरु आहेत.
गेल्या सहमहिण्यात कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे व शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शहरात अचानक नाकाबंदी करून वाहन चालविणाऱ्या चालकांणी मद्यप्राशान केले आहे काय? याबाबत ब्रेथ ऑनालाझर उपकरणाद्वारे तपासणी करून असे शहरातील 1 हजार वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई केलेल्यांविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात येते आहे. न्यायालय आरोपीस सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास व दोन हजार रुपयापर्यंत दंडाची तरतुद आहे. वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.