नवी दिल्ली – एक देश, एक रेशनकार्ड योजनेच्या अंमलबजावणीबाबत सरकार आग्रही असून मार्च महिन्यापर्यंत देशभर या योजनेचा अंमल होणार असल्याचे अन्न मंत्रालयाने म्हटले आहे.
या योजनेनुसार रेशनकार्डावरील धान्य कार्डधारकांना देशातील कोणत्याही भागात मिळू शकणार आहे. त्यामुळे स्थलांतरित कामगारांना मदत होणार आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत 80 कोटी लोकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. एक देश – एक रेशनकार्ड योजनेमुळे ही सुविधा सर्वत्र उपलब्ध होण्यात मदत होईल.