श्रीनगर : दहशतवाद्यांनी केलेल्या हातबॉम्बच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर अन्य13 जण जखमी झाले. सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने हे हातबॉम्ब फेकण्यात आले.
हा हल्ला राजा हरीसिंग महामार्गावरील लाल चौक भागात करण्यात आला. या हल्ल्यानंतर या भागात नाकबंदी करण्यात आली असून अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्यात आली आहे. हा हल्ला दुपारी 1 वाहजून 20 मिनिटांच्या सुमारास करण्यात आला. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीपैकी नऊ जणांना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
गेल्या 15 दिवसांत दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हातबॉम्ब हल्ला आहे. यापुर्वी 26 ऑक्टोबर रोजी सापोरे येथे केलेल्या हल्ल्यात 20 जण जखमी झाले होते. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तारातून निषेध व्यक्त होत आहे.