जामखेड : भुतवडा तलावातील पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. अश्रू उत्तम डोंगरे (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. तीन दिवसानंतर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना अढळुन आला आहे.
मृतदेहाच्या गळ्याभोवती दगड बांधलेला टॉवेल अढळुन आला आहे. सदर इसमाने आत्महत्या केली आसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या बाबत मिळालेली अशी की मयत आश्रू डोंगरे हे १३ रोजी पांडववस्ती येथील घरातुन बाहेर पडले होते. मात्र सायंकाळी ते घरी परतले नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र ते कुठेच आढळून आले नाहीत.
सोमवार सकाळी त्यांचा मृतदेह भुतवडा तलावात तरंगताना स्थानिक लोकांना अढळुन आला. स्थानिक ही माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली.
यानंतर मृतदेह भुतवड तलावातून गावातील स्थानिक गौतम देवराव डोंगरे, बाबू युवराज डोके यांनी बाहेर काढला. या वेळी मृतदेहाच्या गळ्याभोवती टावेल मध्ये दगड बांधलेला अढळुन आला.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी मृतदेह पोलिसांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व उपनिरीक्षक निलेश कांबळे यांनी भेट दिली.