मुंबई : केंद्र सरकारकडून सातत्याने अर्थव्यवस्थेला चालना देणारे उपाय करण्यात येत असल्याने याचा परिणाम शेअर बाजार वधारण्याच्या रुपाने दिसून येत आहे. आज बाजार सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक सेन्सेक्सने 1300 अंकांनी उसळी घेतली आणि तो 39046.20 वर पोहोचला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टीमध्येही वाढ होऊन तो 11,500 च्या पार पोहोचला असल्याचे दिसून येत आहे.
Sensex currently at 39,005.79, up by 991.17 points pic.twitter.com/R6mfZQNuFB
— ANI (@ANI) September 23, 2019
कोटक महिन्द्रा एएमसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि इक्विटी रिसर्चर विभागाचे प्रमुख शिबानी कुरिअन यांनी यांनी याविषयी माहिती दिली. केंद्र सरकारने देशातील कॉर्पोरेट क्षेत्राला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. याबरोबरच जुलै महिन्यांत वाढवण्यात आलेल्या टॅक्स सरचार्ज हा इक्विटी शेअर्सच्या विक्रीमुळे मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर लागू होणार नसल्याने त्याचा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला. अर्थतज्ज्ञांच्या मते, कॉर्पोरेट टॅक्समधील कपातीमुळे या वर्षी डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 6 ते 11 टक्क्यांची वाढ होऊ शकते. टॅक्स कमी झाल्यामुळे कंपन्यांच्या फायद्यात वाढ होईल. त्याचा परिणाम मागणीमध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.