मुंबई – नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात उरुसाच्या मिरवणुकीत त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्यासाठी मुस्लीम बांधव मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आल्यानंतर चांगलाच वाद पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे, अशात आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे म्हणाले,’तिथे हि परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. तसेच हा जो काही विषय आहे तो संस्थांनाचा आणि गावकऱ्यांचा विषय आहे. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा मशिदी आहेत जिथे हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहतात.’
राज ठाकरे पुढे म्हणाले,’माहीमचा दर्गा आहे मकदुमबाबांचा तिथे उरुस असताना जी चादर चढवतात ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चढवतो. अशी अनेक उदाहारणं देता येतील. मला वाटतं जे परंपरा सुरु ठेवली पाहिजे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आपला आहे का? याआधी मी देखील दर्गा, मशिदींमध्ये गेलो आहे. मुस्लिम लोकंही मंदिरात येतात. आपलीच काही मंदिरं अशी आहेत जिथे काही जातींनाच गाभाऱ्यात जाऊ दिलं जातं.’ असं म्हणत या वादावर त्यांनी आपलं मत मांडलं आहे.