मुंबई – विधीमंडळ अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून निदर्शने केली. युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात आलेली नाही, या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.
Mumbai: Congress and Nationalist Congress Party leaders hold protest at Maharashtra Assembly over the issue of farm loan waiver and state government policies. pic.twitter.com/GcAB8QpPqt
— ANI (@ANI) June 18, 2019
महाराष्ट्र भीषण दुष्काळाने होरपळून निघाला आहे. जून महिना सुरू होऊनही पावसाचा पत्ता नाही. शेतकरी गंभीर संकटात आहे. म्हणून या मुक्या-बहिऱ्या सरकारला जागं करण्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन केले.#MonsoonSession #drought19 pic.twitter.com/hWRyNHkaLh
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 18, 2019