चिंबळी (प्रतिनिधी) – दैनिक प्रभातचा 91वा वर्धापनदिनानिमित्त मोई आणि कुरुळी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानाने मोई येथे सरपंच शीलाताई रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली केक कापण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दैनिक प्रभातवर शुभेच्छांचा वर्षाव केला. वर्षभरात गावातील विकासकामे तसेच इतर समस्यांवर प्रकाश टाकून गावचे नाव जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात आले. त्याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मोईचे उपसरपंच शीतल गवारे, माजी उपसरपंच सचिन येळवंडे, दैनिक प्रभातचे वरिष्ठ उपसंपादक श्रीकृष्ण पादिर, प्रतिनिधी सुनील बटवाल, डिजिटल प्रभातचे ज्ञानेश्वर फड, मोईचे माजी सरपंच राहुल गवारे, माजी उपसरपंच किरण गवारे, देविदास मेदनकर, कुरुळीचे माजी उपसरपंच चंदन मुऱ्हे, उपसरपंच विशाल सोनवणे, ग्रामसेवक भास्कर वीर, खेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष मारुती येळवंडे, पोलीस पाटील, नारायण बिडकर, सदस्य गोरख गवारे, कृषी सहायक संतोष सरोदे, सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
श्रीकृष्ण पादिर यांनी प्रभातच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. सूत्रसंचालन ग्रामसेवक भास्कर वीर यांनी केले. पत्रकार बटवाल यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त प्रतिज्ञा करून कार्यक्रमाची सांगता झाली.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रभावी असलेले दैनिक प्रभात समाजाच्या व्यथा वेदनांना न्याय देण्याचे कार्य करत आहे. प्रभातची वाटचाल नेहमीच समाजाभिमुख राहिलेली आहे. चांगल्या कामाचा गौरव आणि चुकीच्या घटनांवर प्रहार देण्याचे कार्य प्रभात करते. त्यामुळेच प्रभात वर्तमानपत्र पुणे जिल्ह्यात लोकप्रिय आहे. प्रभातच्या 91व्या वर्धापनदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
-चंदन मुऱ्हे, माजी उपसरपंच, कुरुळी
कुरुळी ग्रामपंचायतच्या विकासात दैनिक प्रभातचा मोलाचा वाटा आहे. गावातील विकास तसेच समस्यांबाबत वेळोवेळी प्रभातमध्ये बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. निर्भीड आणि निःपक्ष दैनिक प्रभातच्या 91व्या वर्धापन दिनानिमित्त खूप शुभेच्छा
-विशाल सोनवणे (उपसरपंच, कुरुळी)
गावातील प्रत्येक बातमी प्रभातमध्ये प्रसिद्ध होते. चांगल्या कामांचा नेहमीच गौरव केला जातो. तसेच गावात काही चुकीचे घडत असल्यास त्याबाबतही वृत्त देण्यात येते. लोकशाहीचा चौथा स्तंभ निर्भीड आणि निःपक्ष दैनिक प्रभातला वर्धापनदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
-राहुल गवारे, माजी सरपंच, मोई
गावच्या विकासासंदर्भात शासन दरबारी एखादी मागणी केल्यास सर्वप्रथम प्रभातमध्ये त्याला प्रसिद्धी देण्यात येते. प्रभातमध्ये बातमी छापून आल्यास अधिकारीही त्याची दखल घेतात आणि तात्काळ काम मार्गी लागते. मोई गावच्या विकासात प्रभाताच मोलाचा वाटा आहे.
-किरण गवारे, शिवसेना उपतालुका प्रमुख, माजी उपसरपंच, मोई