मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा म्हटले आहे की, मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत जोपर्यंत सरकार कारवाई करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचा आमचा निर्धार कायम आहे.
View this post on Instagram
राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादच्या सभेतील नियम भंगाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांच्या संबंधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. राज्यभरात सुमारे 250 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर अनेक कार्यकर्त्यांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. सध्या या भोंग्याच्या प्रकरणावरून राजकीय नेत्यांपासून अनेक लोकांच्या प्रतिक्रिया उमटत असताना दिसत आहे. नुकतंच या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता सोनू सूदने आपलं मत मांडलं आहे.
View this post on Instagram
सोनू सुद म्हणाला,’देशाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा धर्म, जात यातून बाहेर पडू. जी ताकद हनुमान चालीसामध्ये आहे तीच ताकद नमाजमध्येही आहे.देशात अजूनही खूप मोठे मोठे मुद्दे आहेत ते त्यासाठी देशाला एकत्र होणे फार महत्त्वाचे आहे. जर आपण याच गोष्टीत अडकून राहिलो तर लोकांच्या समस्या कधीही संपणार नाही. ‘
View this post on Instagram
तो पुढे म्हणाला, हनुमान चालीसा जेवढी चांगली वाटते, तेवढंच नमाज ऐकण्यात चांगलं वाटत. धर्म हा लोकांनी बनवलाय आणि यातून बाहेर पडण्याची आपल्याला फार गरज आहे. आणि सर्वानी मिळून पहिल्यांदा हा विचार करायला हवा की, बाकीच्या गोष्टींना महत्व देण्याची गरज आहे की नाही.” अस तो म्हणाला.