पाकिस्तान – पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने संघ निवडीत मुख्य निवडकर्त्या अधिकार्यासोबत झालेल्या वादावर एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. सहमती आणि असहमती ही होत राहते.
नुकतीच काही दिवसापूर्वी बातमी आली होती की, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड केलेल्या संघात बाबर आझमचा सल्ला ऐकला गेला नव्हता आणि यामुळे तो नाराज आहे. पाकिस्तानच्या माध्यमात हा दावा केला आहे. की संघ निवडताना त्याच्या मताला दुर्लक्ष केल्यामुळे बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि मुख्य निवडकर्ता अधिकारी मोहम्मद वसीम यांच्याकडे आपली चिंता उपस्थित केली होती.
बाबर आझमने संपूर्ण प्रकरणावर दिली प्रतिक्रिया
बाबर आझमच्या मते, अशा गोष्टी केवळ बंद खोलीत राहिला हव्यात आणि माध्यमांच्या आल्या नाही पाहिजे. तो म्हणाला, “जर या सर्व गोष्टी मीटिंग रूम राहिलात तर जास्त योग्य राहतील. जेव्हा ही कोणती डिबेट होते, तर ही संघासाठी चांगली गोष्ट असते.
कारण जेव्हा कोणती चर्चा होते, तेव्हा सहमती आणि असहमती होणे स्वाभाविक आहे. परंतु या गोष्टी बाहेर यायला नकोत. हा फक्त माझा संघ नाही, तर सर्वांचा संघ आहे. निवडीच्या नियमांबाबत मला माहिती आहे आणि माझे काम बेस्ट प्लेईंग इलेव्हन खेळवणे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेणे आहे.”
पाकिस्तान संघाला दक्षिण आफ्रिका दौर्यावर तीन वनडे आणि आणि चार टी-20 सामने खेळायचे आहे. यानंतर झिम्बाब्वे दौरा करायचा आहे. यामधे दोन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. यापूर्वी बाबर आझमचा सल्ला दुर्लक्षित केल्याने बर्याच माजी खेळाडूंनी संघ निवड करत्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.