- आम्ही चार पावले मागे घेतले म्हणून आघाडी मजबूत
- बेलवंडी गटातील उद्भव आवर्तनातून भरावेत
- पालकमंत्री शिंदे, तहसीलदार माळी यांना दिले निवेदन
श्रीगोंदा: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगतील त्याच दिवशी आमचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात यावेळी पवार भाकरी फिरवतील, अशी अपेक्षा आहे. नागवडे घराण्यास यावेळी निश्चितच संधी मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
सुरू असलेल्या कुकडीच्या आवर्तनातून बेलवंडी जिल्हा परिषद गटातील 20 उद्भव पिण्याच्या पाण्यासाठी व पशुधन वाचविण्यासाठी तातडीने भरून मिळावेत, अशी आग्रही मागणी जिल्हा परिषदेच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी केली आहे.
नागवडे यांनी 20 उदभवांची यादी सोबत दिली आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, कुकडीचे अधिकारी व तहसीलदार महेंद्र माळी यांना दिलेल्या निवेदनात नागवडे यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी जिल्हा परिषद गटातील बेलवंडी, चिंभळा, लोणी व्यंकनाथ, शिरसगाव बोडखा, पिसोरे, मढेवडगाव, वांगदरी, हंगेवाडीमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत आहे. पाण्याचे उद्भव पूर्ण कोरडे पडले असून, पाणी कोठून आणायचे व पशुधन कसे जगवायचे ही समस्या निर्माण झाली आहे. सध्या कुकडीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू आहे. बेलवंडी गटातील तलाव व साठवण बंधारे भरून मिळावे. कुकडी कालव्याचे पाणी विसापूर चारीच्या माध्यमातून सोडून जास्तीत जास्त तलाव व साठवण बंधारे भरून देण्याची सूचना तातडीने द्यावी. तसेच फळबागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत. शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी जळालेल्या फळबागांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे, असे नागवडे यांनी म्हटले आहे.