नवी दिल्ली : काँग्रेसने नुकताच सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात राहुल गांधी त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या विमान चालवण्याच्या छंदावर भाष्य करताना दिसतात. तसेच राहुल गांधी यांनी संजय गांधी यांच्या विमान दुर्घटनेच्या दिवसाचा एक खुलासा देखील सर्वांसमोर आणला आहे. ज्या दिवशी राजीव गांधी यांचे बंधू संजय गांधी यांचं विमान दुर्घटनेत मृत्यू झाला त्या दिवशी वडिलांनी काकांना विमान उड्डाण करण्यापासून रोखले होते असे राहुल गांधी म्हणाले.
अलीकडेच भारतीय युवक काँग्रेसने राजीव गांधी यांच्या फोटो प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यात राहुल गांधी त्यांच्या वडिलांसोबत केलेल्या विमान प्रवासाच्या काही आठवणीत शेअर करतात. राहुल गांधी म्हणतात की, मी माझ्या वडिलांसोबत सकाळी विमानाने निघालो होतो. आम्हा दोघांनाही विमान उड्डाण करणं आवडतं.
जेव्हा कधीही वडील विमान उड्डाणासाठी जात होते तेव्हा आई नेहमी चिंतेत असायची. हे खूप धोकादायक होतं त्यामुळे तिला भीती वाटायची. एकदा विमानात काही समस्या निर्माण झाली त्यात राजीव गांधी होते. तेव्हा मला आठवतंय माझी आई खूप घाबरली होती असे त्यांनी सांगितले.
व्हिडीओत राहुल गांधी त्यांचे काका संजय गांधी यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूबद्दलही बोलताना दिसतात. ज्यादिवशी संजय गांधी यांचा विमानाच्या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाला तेव्हा राजीव गांधी यांनी त्यांना रोखले होते. माझे काका जे विमान उडवणार होते ते खूप वेगवान होते. माझ्या वडिलांनी सांगितले, “तुम्ही असं करू नका. माझ्या काकांकडे तितका अनुभव नव्हता. माझ्या काकाकडे तीन ते साडे तीन तास विमान उड्डाण करण्याचा अनुभव होता जितका मला आहे. त्यांनी ते विमान नको उडवायला होतं तरीही त्यांनी विमान उड्डाण केले आणि एका क्षणात सर्व काही संपले… असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळाजवळ २३ जून १९८० मध्ये संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. एक पायलट कसा स्वत:ला नेता म्हणून प्रशिक्षित करतो यावर राहुल गांधी यांनी पायलटमध्ये विशेष गुण असतो जो त्यांना प्रशिक्षण घेताना मिळतो.
पायलटला ३० हजार फूट उंचीवर दिसणारं दृश्य त्याच्या नजरेत पाहावं लागतं. जर तुम्हाला कॉकपिटच्या आतील गोष्टीवर लक्ष ठेवता आलं नाही तर समस्या निर्माण होते. ३० हजार फूट उंचीवरील दृश्यावरुन नजर हटवल्यास समस्या येते. त्यामुळेच पायलट आणि मी एकसारखाच आहे. आम्ही दोघंही एकाच ठिकाणी तीक्ष्ण नजरेने पाहतो असे राहुल गांधी म्हणाले.