मुंबई : मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भालके यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात आता रंगताना दिसत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी देण्यात यावी अशी मागणी देखील आता जोर धरत आहे. या चर्चांवर प्रथमच राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वृत्त माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, ‘सोलापुरात एका स्थानिक वर्तमानपत्रात एक काल्पनिक राजकीय सदर छापून आल्यानंतर पार्थच्या उमेदवारीची चर्चा रंगलीय. पार्थ पवारांना मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्यावर अजून कुठलीही चर्चा नाही.” असं मत त्यांनी स्पष्ट केलंय.