मुंबई – राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर अतिशय आनंदाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल देशमुख ?
‘अखेर राष्ट्रपतींनी राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला ही आनंदाची गोष्ट आहे. सातत्याने महापुरूषांविरोधात अवमानकारक वक्तव्य त्यांच्याकडून होत होती, त्यामुळे हा राजीनामा मंजूर झाला आनंदीची गोष्ट आहे. नवीन राज्यपाल रमेश बैंस यांचे आम्ही महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून स्वागत करतो.’ असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.