मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रियता मिळवूनही आत्महत्या करून जीवन संपवलेल्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरूच असून या विषयाला सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला आहे.
आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट आदी स्टार कलाकारांना बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर धक्का बसला. सोशल मीडियावर सर्व स्टार किड्स घराणेशाही बाबत व्यक्त होतांना दिसत आहे.
याच मुद्यावर आता बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरने वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत मांडलं आहे. “आम्हाला प्रेक्षकांनी घडवलं आहे, आणखी कोणी नाही. जे लोक आता आमच्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांनीच आम्हाला स्टार बनवलंय. तुम्ही जाताय ना चित्रपट बघायला? नका जाऊ. कोणी तुमच्यावर जबरदस्ती केली नाही.
ती पुढे म्हणाली,’मला हा संपूर्ण वादच विचित्रपणा वाटतो. आलिया भट्ट असो किंवा करीन कपूर.. आम्हीसुद्धा मेहनत केली आहे. तुम्ही आमचे चित्रपट पाहता आणि त्यांचा आनंदसुद्धा लुटता. त्यामुळे प्रेक्षकच आम्हाला घडवू शकतात. मीसुद्धा संघर्ष केला आहे. फक्त घराणेशाहीमुळे माझं २१ वर्षांचं करिअर घडलं नसतं. हे शक्यच नाहीये”