नवी दिल्ली – ओमायक्रॉन रुग्ण संख्येत दिल्लीने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. दिल्लीत आता एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 142 झाली आहे तर महाराष्ट्रात आता 141 प्रकरणे आहेत. देशात एकूण 598 रुग्ण आहेत. ओमायक्रॉनया धोका लक्षात घेता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने आज रात्रीपासून राजधानीत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे.
देशात करोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरीयंटचा प्रसार झपाट्याने सुरू झाला आहे. आतापर्यंत ओमायक्रॉन 19 राज्यासह केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला असून एकूण बाधितांची संख्या 598 झाली आहे. ओमायक्रॉन बाधितांमध्ये दिल्लीने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. दिल्लीत आता सर्वाधिक 142 प्रकरणे आहेत. त्याचवेळी 141 बाधितांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.
याशिवाय गुजरात (49), तेलंगणा (44), केरळ (57), तामिळनाडू (34), कर्नाटक (38), राजस्थान (43), हरियाणा (10), मध्य प्रदेश (9), ओडिशा (8) , आंध्र प्रदेश (6), पी. बंगाल (6), जम्मू आणि काश्मीर (3), उत्तर प्रदेश (2) चंदीगड (3), लडाख (1), उत्तराखंड (1), हिमाचल (1) मध्ये देखील ओमायक्रॉनची प्रकरणे आहेत.
करोनाच्या संसर्गाच्या दरातही 0.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने राजधानीत रात्री कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे.