बाजारात 80 गाड्यांची आवक; गुजरात, मध्य प्रदेश येथून 12 ट्रक लसूण आवक
पुणे – जिल्ह्यासह विभागात पावसामुळे मार्केट यार्डात सलग दुसऱ्या आठवड्यात फळभाज्यांची आवक कमी झाली. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भेंडी, गवार, गाजर, हिरवी मिरची, काकडी, दोडकाच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली होती. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व भाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी येथील् बाजारात 80 गाड्यांची आवक झाली. परराज्यातुन आलेल्या मालामध्ये इंदौर येथून 7 टेम्पो गाजर, कर्नाटक, गुजरात येथून 3 टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात येथून 10 टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडू येथून शेवगा 3 टेम्पो, तर आग्रा आणि इंदौर येथून 40 ट्रक बटाटा, तर गुजरात आणि मध्य प्रदेश येथून लसूण 12 ट्रक आवक झाली होती.
स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 गोणी, कोबी सुमारे 4 टेम्पो, फ्लॉवर 10 टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे 5 टेम्पो, सिमला मिरची 10 टेम्पो, हिरवी मिरची 3 टेम्पो, टोमॅटो 6 हजार पेटी आवक झाली होती. तर, भुईमुग शेंगा सुमारे 100 गोणी, पारनेर, पुरंदर येथून मटार अवघी सुमारे 30 गोणी, तांबडा भोपळा 8 टेम्पो, कांदा सुमारे 70 ट्रक आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : 250-380, बटाटा : 250-320, लसूण : 600-1200, आले : 200-300, भेंडी : 300-400, गवार : 500-600, टोमॅटो : 150-250, दोडका : 300-500, हिरवी मिरची : 300-450, दुधी भोपळा : 250-350, चवळी : 250-300, काकडी : 200-250, कारली : हिरवी 300-400, पांढरी 250-300, पापडी : 350-400, पडवळ : 200-250, फ्लॉवर : 150-250, कोबी : 120-160, वांगी : 300-400, डिंगरी : 200-250, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची : 250-320, तोंडली : कळी 450-500, जाड : 180-200, शेवगा : 500-700, गाजर : 200-250, वालवर : 300-400, बीट : 140-150, घेवडा : 600-700, कोहळा : 100-150, आर्वी : 200-250, घोसावळे : 200-250, ढेमसे : 250-300, पावटा : 300-400, भुईमूग शेंग : 300-400, मटार : 1400-1600, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 200-220, मका कणीस : 60-120, नारळ (शेकडा) : 1000-1600.