रांची – भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रांचीमध्ये शेवटचा तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता सध्या 5 बाद 379 धावांवर भारताचा खेळ सुरू आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारताचा हिटमॅन रोहित शर्माने कसोटीतील पहिले द्विशतक झळकावले आहे.
Take a bow, HITMAN ??
An absolutely sensational innings from @ImRo45 as he brings up his double ton here in Ranchi. pic.twitter.com/zqLCCfQzqX
— BCCI (@BCCI) October 20, 2019
विशेष म्हणजे या सामन्यात रोहितने आपले शतक आणि द्विशतक हे षटकाराच्या सहाय्याने पूर्ण केले आहे. या खेळीने एक अनोखा योगायोग साधला गेला आहे. कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाकडून झळकावलेलं हे तिसरे द्विशतक ठरले आहे. एका कसोटी मालिकेत भारताच्या ३ फलंदाजांनी द्विशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
100 ✔
150 ✔
200 ✔@ImRo45 you beauty ? pic.twitter.com/FDMXsjlwcr— BCCI (@BCCI) October 20, 2019
मात्र, मात्र रोहित शर्मा २१२ धावांवर असताना रबाडाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या नादात एन्गिडीकडे झेल देत माघारी परतला. आपल्या द्विशतकी खेळीत रोहितने २८ चौकार आणि ६ षटकार खेचले. आता सध्या वृद्धिमान सहा 8 धावांवर तर रविंद्र जडेजा 22 धावांवर खेळत आहेत.