मुंबई – सत्ता स्थापनेच्या नाट्यानंतर राज्यात अखेर ठाकरे सरकारचा उद्या झाला. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाल्याने आता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान “वर्षा’ हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिकामं करावे लागले. परंतु, आता वर्षा बंगल्यात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने नवा वादास तोंड फुटले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंगला सोडल्यानंतर बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरेंबद्दल लिहिलेला मजकूर सध्या व्हायरल होत आहे. नवीन मुख्यमंत्र्यांना रहाण्यासाठी तयार करण्यात येत होता. त्यावेळी वर्षा बंगल्यातील खोलीतील भिंतींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहले असल्याची माहिती मिळत आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी डर्टी पॉलिटिक्स अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट नकार दिला आहे.
फडणवीस म्हणाले कि, बंगला सोडण्यापूर्वी आम्ही एक एक कोपरा चेक केला होता. तिथं कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्स आहेत आणि त्यांची मुलंही खेळत असतात. मला नाही माहिती ते कोणी लिहिलं. हे खूप वाईट आणि खालच्या पातळीचं राजकारण असून बदनामीसाठी केलं जात आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, यावर आता नवाब मलिक यांनी टीका केली आहे.