मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या संबंधात केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या संबंधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात धुळे जिल्ह्यात दाखल झालेल्या एफआयआरप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देताना दोन आठवडे त्यांच्या अटकेला मनाई केली आहे.
भाजपचे नेते राणे यांनी या वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मध्यंतरी राणेंना अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केली होती.
हे अंतरिम संरक्षण आहे. या दरम्यान, जर तुम्हाला (राणे) अटक झाली तर तुम्ही योग्य कायदेशीर उपाय शोधू शकता,” असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर एका वक्तव्या प्रकरणी कठोर भाषेत टीका केली होती. मुख्यमंत्र्यांना हा कितवा स्वातंत्र्यदिन आहे हे माहिती नाही, त्यांनी चुकीचा उल्लेख त्या ठिकाणी केला, मी जर तेथे असतो तर कानाखालीच मारली असती असे विधान राणे यांनी केले होते. त्यावरून त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.