मुंबई – जर राज्यात ओबीसी आरक्षण लागू झाले आहे. मग या 91 नगरपालिकांमध्ये लागू व्हावे, अशी विनंती आम्ही न्यायालयाला केली होती. मात्र, न्यायालयाने ही सुधारणा करण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुळात न्यायालायने हा निर्णय का दिला. याचे आर्श्चय वाटत असल्याचेही ते म्हणाले.