मयंक आणि अंजिक्यने डाव सावरला
वेलिंग्टन : भारत विरूध्द न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर ५५ षटकांत ५ बाद १२२ अशी मजल मारली आहे.
Stumps on day one!
The third session of play has been washed out in Wellington. Having reduced India to 122/5, New Zealand will be pleased with their day's work.#NZvIND pic.twitter.com/m3XP88A2Hy
— ICC (@ICC) February 21, 2020
सामन्यात न्यूझीलंडने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. सलामीवीर पृथ्वी शाॅला चांगली सुरूवात करता आली नाही. शाॅ १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारालाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही, तो ११ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र तो अपयशी ठरला. विराटला २ धावांवर कायले जॅमीसन याने राॅस टेलरकरवी झेलबाद केले. कोहली बाद झाला तेव्हा भारताची अवस्था १७.५ षटकांत ३ बाद ४० अशी झाली होती. पहिल्या सत्रात भारताने २८ षटकांत ३ बाद ७९ अशी मजल मारली होती.
Trent Boult strikes!
Just when the partnership for the fourth 🇮🇳 wicket was starting to take shape, Boult bounces out Mayank Agarwal for 34.
Follow #NZvIND 👉 https://t.co/UxqdaHZ14g pic.twitter.com/2v6WFuX5p7
— ICC (@ICC) February 21, 2020
दुस-या सत्रात देखील भारताची सुरूवात चांगली झाली नाही आणि दुस-या सत्रातील सातव्या षटकांत ट्रेट बोल्टने मयंक अग्रवालला ३४(८४) धावांवर कायले जॅमीसनकरवी झेलबाद करत चौथा धक्का दिला. त्यानंतर नवोदित हनुमा विहारीलाही मोठी खेळी करता नाही आणि तो केवळ ७ धावा काढून बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या ४१.१ षटकांत ५ बाद १०१ अशी होती.
एका बाजूने भारतीय संघाची पडझड होत असताना अजिंक्य रहाणेने एक बाजू लावून धरली होती. त्याने रिषभ पंतच्या साथीनं डाव सावरत दुस-या सत्रापर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत कायले जॅमीसनने सर्वाधिक ३ तर टिम साउदी आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुस-या सत्राचा खेळ संपल्यानंतर पाऊसाने हजेरी लावली आणि त्यामुळे तिस-या सत्राचा खेळ वाया गेला. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने दिवसअखेर ५५ षटकांत ५ बाद १२२ अशी मजल मारली असून खेळ थांबला तेव्हा रिषभ पंत १०(३७) आणि अंजिक्य रहाणे ३८ (१२२) धावांवर खेळत होता.