नवी दिल्ली – डिजिटल व्यवहार वाढावे याकरिता केंद्र सरकारने युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे यूपीआय यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेद्वारा होणाऱ्या व्यवहारात वेगाने वाढ होत आहे.
जुलै महिन्यामध्ये यूपीआयद्वारा 149 कोटी व्यवहार झाल्याचे दिसून आले. हा एक विक्रम आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, 149 कोटी व्यवहारांत 2.91 लाख कोटी मूल्यांचे व्यवहार झाले. ही आकडेवारी अतिशय आशादायक बाब आहे.
जून महिन्यामध्ये 134 कोटी व्यवहार झाले होते. एका महिन्यात यात पंधरा कोटी व्यवहार वाढले आहेत. एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांमध्ये एकूण 631 कोटी व्यवहार झाले, यातील मूल्य 6.31 लाख कोटी रुपयांचे आहे.
या कालावधीत यूपीआयद्वारा वाढलेल्या व्यवहाराची कारणमीमांसा करताना विश्लेषकांनी सांगितले की, या काळात लॉकडाऊन सक्रिय होते. त्यामुळे नागरिकानी रोखीऐवजी डिजिटल पेमेंट बारा व्यवहार केले आहेत. आता नागरिकांना अशा व्यवहाराची सवय झाली आहे. त्यामुळे आगामी काळात डिजिटल व्यवहार आणखी वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी सरकार आणि बॅंका सवलती देत आहेत.