नवी दिल्ली- सप्टेंबर महिन्यात भारतात 16,570 नव्या कंपन्यांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे भारतात नोंदणी झालेल्या एकूण कंपन्यांची संख्या 14.14 लाख इतकी झाली आहे.
या सर्व कंपन्या सक्रीय असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.
30 सप्टेंबर पर्यंत देशातील कंपन्यांची संख्या 22,32,699 इतकी होती. मात्र त्यातील 7,73,70 इतक्या कंपन्या बंद पडल्या आहेत. तर 2298 कंपन्या अंशतः बंद आहेत. 6944 कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत तर 36,110 कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याच्या अवस्थेत आहे.
त्यामुळे 30 सप्टेंबर अखेरीस 14.14 लाख कंपन्या सक्रिय आहेत. एप्रिल 2020 पर्यंत कंपन्यांची नोंदणी कमी झाली होती. मात्र त्यानंतर कंपन्यांच्या नोंदणीत वेगाने वाढ होत आहे. कंपनी नोंदणीची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
उद्योग करण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करण्यात येत असल्यामुळे कंपन्यांच्या नोंदणीत वाढ झाली असल्याचे मंत्रालयाला वाटते. कंपन्यांची नोंदणी ऑनलाइन करणे, कर व्यवस्थेत सुधारणा करणे इत्यादी उपाययोजना केंद्र सरकारकडून केल्या जात आहेत