नवी दिल्ली – देशात सध्या कोळशाची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्यामुळे वीज उत्पादनावर परिणाम झाला आहे. हा परिणाम कमी करण्यासाठी एनटीपीसी ही औष्णिक वीज उत्पादन करणारी कंपनी 10 लाख कोळश्याची आयात करणार आहे.
यापूर्वी 2019 मध्ये या कंपनीने कोळशाची आयात केली होती. त्यानंतर देशातील कोळसा उत्पादन आणि पुरवठा परिस्थिती समाधानकारक असल्यामुळे कोळसा आयात करण्याची गरज पडली नव्हती. आयात केलेला कोळसा विविध वीज प्रकल्पांना पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.