अयोध्या – अयोध्येत राम मंदिर व्हावे म्हणून आयुष्यभर प्रयत्नशील राहिलेले रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांची केंद्र सरकारने या संबंधात स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टवर नेमणूक केलेली नाही. म्हणून ते नाराज झाले आहेत. ही नाराजी त्यांनी स्वत: बोलावून दाखवली आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने आपल्या पक्षाच्या तीन नेत्यांना त्यांच्या भेटीसाठी पाठवले.
आमदार वेदप्रकाश गुप्ता, महापौर ऋषीकेश उपाध्याय, आणि अयोध्या महानगर भाजप अध्यक्ष अभिषेक मिश्रा हे तीन नेते या संबंधात नृत्यगोपाल दास यांच्याशी चर्चा करण्यासाठी तिकडे गेले पण त्यांना नृत्यगोपाल दास यांनी कोणतीहीं किंमत न देता त्यांना तेथून माघारी परतवून लावले आहे.
दरम्यान सरकारनेही तातडीने कार्यवाही करीत नृत्यगोपाल दास यांचे उत्तराधिकारी महंत कमल नयन दास यांच्याशी फोनवर चर्चा केली. खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्याशी चर्चा करून या प्रकरणातील वाद निवळण्याचा प्रयत्न केला. ट्रस्ट मधील तीन जागा अजून रिक्त असून त्या जागी महंतांना ऍडजस्ट केले जाईल असा अमित शहा यांनी महंत कमल नयन दास यांना सांगितल्याचेही सांगण्यात येते.