मुंबई: सीएए अंमलबजावणी राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. सर्व अधिकार केंद्राकडे आहे. आमच्या अखत्यारित नसताना का राबवावा असा सवाल करतानाच एनआरसी लागू होवू देणार नाही असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले.
एनआरसी आणणार नाही असे सांगून आपली भूमिका भाजपने बदलली. मात्र याबाबत सरकारने व आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे.
२०१० च्या जनगणनेच्या वेळी एनपीआरसाठी प्रश्नावली तयार झाली होती. मात्र त्यातील प्रश्न आम्हाला मान्य नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्ष याबाबत एकत्र बसून चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अपेक्षित आहे ते आम्ही लागू करु देणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.