नवाब मालिक यांचा आरोप
मुंबई: अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी खाजगी कंत्राटदाराला मोठे काम देवून आर्थिक फायदा पोचविण्यासाठी एनपीआर’चा निर्णय घेतलेला आहे. ८५०० कोटींचा निधी एनपीआर वर खर्च करण्यापेक्षा आणखी नवीन आधार कार्ड सेंटर सुरु करून लवकरात लवकर आधार कार्ड जनतेला मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ता नवाब मलिक यांनी दिली आहे.
दरम्यान, एनपीआरची सुरवात पुढील वर्षी एप्रिलमध्ये होईल. २०२१ मधील जनगणनेच्या कामाची सुरवात एप्रिल ते सप्टेंबत २०२० मध्ये करण्यात येईल. ती आसाम वगळता सर्व राज्यात राबवण्यात येईल.
याबाबतची अधीसुचना ऑगस्ट महिन्यात काढण्यात येणार असून एनआरपी ही स्थानिक (गाव/उपशहर), उपजिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर करण्यात येईल . नागरिकत्व कायदा १९५५ आणि नागरिकत्व नियम २००३ नुसार ती करण्यात येईल. सर्व भारतीयांना एनआरपीमध्ये नावनोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाची एकत्रित माहिती हा यामागचा उद्देश आहे. त्यात भौगोलिक आणि जीवमितीय माहिती असेल.