पुणे (प्रतिनिधी) – शेतकरी ज्यांची आतुरतेने वाट पाहत असतात तो मान्सून अखरे महाराष्ट्रात दाखल झाला असल्याचे हवामान विभागाने आज स्पष्ट केले.मान्सून दाखल झाला तरी पावसाचा जोर अद्याप सुरू झाला नसून येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
कोकण मध्य महाराष्ट्र मरावाड्यासह दक्षिण भागात मान्सूनने आज प्रगती केली आहे.संपुर्ण कर्नाटक,गोवा आणि रायल सिमा भाग व्यापणाऱ्या मान्सूनने हर्णे सोलापूर पर्यत मजल मारली असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.शनिवार पर्यत राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक ठरले आहे.गेल्या दोन दिवसांपासून कोकण आणि गोव्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मान्सूनने आज अखेर राज्यात प्रवेश केला.
अरबी समुद्रातील वाटचाल पाहता बुधवारी मान्सूनने संपुर्ण तामिळनाडू राज्य व्यापले होते पण दुसऱ्याच दिवशी गुरूवारी अरबी समुद्रात मोठा टप्पा पार करून मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात ही मान्सूनची प्रगती तेलगंणा आणि ओडिशा पर्यत मान्सून पोहचला आहे