कोलकाता – प. बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात घमासान सुरू असली आणि सत्ता काबिज करण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करत असला तरी या राज्यातील जनतेच्या मनावर अजुनही ममतांचेच राज्य चालते असा दावा एबीपी सी वोटरने केला आहे. राजकीय वर्तुळात प्रचारा दरम्यान दोन्ही पक्ष एकमेकानांवर टीका करतांना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक दिग्गज नेते रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरु आहेत.
প্রধানমন্ত্রী শ্রী @narendramodi জী পুরুলিয়াবাসীর মাঝে এসে উপস্থিত হলেন। #BJPErOngikarSonarBangla pic.twitter.com/5EdtQHmi3t
— BJP Bengal (@BJP4Bengal) March 18, 2021
याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरूलिया येथे रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना टोला लगावला असून, ‘दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’ असं म्हणत ममता बॅनर्जींवर जळजळीत टीका केली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘ आता खेळ संपणार आणि विकास सुरू होणार कारण, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारचे अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. ममता बॅनर्जी यांना हे माहित आहे म्हणून त्या ‘खेला होबे’ असं म्हणत आहेत. जर तुम्हाचं ध्येय सेवा करणं असेल तर खेळलं जात नाही.’ म्हणत त्यांनी ‘दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’ प्रचारवेळी ममता बॅनर्जींवर जळजळीत टीका केली आहे.