औंध- भारतामध्ये मटणाची सर्वांत मोठी थाळी सर्वप्रथम सुरू करणाऱ्या ‘तात्यांच्या ढाब्या’वर आता ‘राजकारण’ आणि ‘मतदार’ या दोन नव्या थाळ्या सुरू करण्यात आल्या आहेत. ‘तात्यांच्या ढाब्या’ची तिसरी शाखा खेड-शिवापुर येथे सुरू करण्यात आली. त्यानिमित्ताने या दोन थाळ्यांची घोषणा करण्यात आली.
केवळ एका व्यक्तीसाठी ‘मतदार’ थाळी असून, त्यामध्ये मटण, चिकन आणि गावरान चिकन हे तीन प्रकार उपलब्ध आहेत. ‘राजकारण’ ही सर्वांत मोठी आणि सर्वसमावेशक थाळी असून, त्यामध्ये मटण, चिकन, गावरान चिकन, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, मटण खर्डा आणि चिकन खर्डा अशा सगळ्या पदार्थांचा समावेश आहे.
‘तात्यांच्या ढाब्या’चे संचालक एस. जी. वाळके म्हणाले, “‘तात्यांच्या ढाब्या’च्या बाणेर या मुख्य शाखेबरोबरच चाकण आणि खेड-शिवापुर अशा दोन शाखा सुरू झाल्या असून, शाखांचा विस्तार वाढत आहे. यानिमित्ताने ‘तात्यांच्या ढाब्या’ने दोन वेगळ्या प्रकारच्या थाळ्या सुरू केल्या असून, मेन्यू सुटसुटीत केला आहे. कुटुंबाने आणि मित्रांनी एकत्र येऊन जेवणाचा आनंद घ्यावा अशी ‘तात्यांच्या ढाब्या’ची संकल्पना आहे.
त्यासाठी आता त्याच संकल्पनेमध्ये आता आम्ही ‘राजकारण’ ही थाळी सादर केली आहे. मात्र एक किंवा दोन व्यक्तींना जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, तर एका व्यक्तीसाठीची ‘मतदार’ ही थाळी सुरू करण्यात आली आहे. या थाळ्या म्हणजे ‘तात्यांच्या ढाब्या’चे नवे आकर्षण आहेत. नवीन आम्हाला आशा आहे, की आमच्या सर्व चाहत्यांना या थाळ्या पसंत पडतील. याशिवाय भारतामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या ‘सरपंच’, ‘पाटील’ आणि ‘सावकार’ या थाळ्या ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेतच, असेही एस. जी. वाळके यांनी सांगितले.