जालना – गणेशोत्सवासाठी कोकणमध्ये 150 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार कोकणात जाण्यासाठी अजून काही रेल्वे गाड्या सोडल्या जातील, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. तसेच येत्या 7 तारखेला दादर स्टेशनवरून कोकणात जाण्यासाठी स्वतंत्र मोदी रेल सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हंटले.
गणपती उत्सवादरम्यान लोकांनी कोरोना संसर्गाचे निर्बंध पाळले पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यालाच समर्थन दर्शवत त्यांच्या या विधानाशी आपण सहमत असून निर्बंध लागू असताना देखील करोना काळात रेल्वे सोडायला आम्हाला अडचण नाही. मात्र, त्यासाठी राज्य सरकारची सहमती आवश्यक आहे, असंही दानवे यांनी म्हटले.