नवी दिल्ली – लोकसभेच्या 3 आणि विधानसभांच्या 29 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. संबंधित मतदारसंघांमध्ये 50 टक्क्यांहून ते 75 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. आता 2 नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे.
पोटनिवडणुकांसाठी 13 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात तुरळक घटना वगळता शांततेत मतदान झाले. दादरा आणि नगर हवेली, खंडवा (मध्य प्रदेश) आणि मंडी (हिमाचल प्रदेश) लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीला सामोरे गेले. त्याशिवाय, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश, हरियाणा, मिझोरम आणि तेलंगणात विधानसभा पोटनिवडणुकांसाठी मतदान झाले.
महाराष्ट्रातील देगलूर विधानसभा मतदारसंघही पोटनिवडणुकीला सामोरा गेला. पोटनिवडणुकांमध्ये बहुतांश मतदारसंघांमध्ये भाजप आणि कॉंग्रेस उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या.