मुंबई – पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात काल चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच काल याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. त्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती आहे. तर, चीनचे ४३ सैनिक मारले गेल्याचं सांगितलं जात आहे.
याच संदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्य सैनिकांना मारलं असून चीनला धडा शिकवायला पाहिजे, असेही आव्हाड म्हणाले आहेत.
चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे.
झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे “लाल आंखे” करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 16, 2020
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे की,’ “चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे “लाल आंखे” करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता?” असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.