पुणे – देशातील मुस्लिम समुदायाशी संबंधित तिहेरी तलाक विधेयक प्रचंड वादळी चर्चेनंतर लोकसभेमध्ये मंजूर झाला. या विधेयकावर अनेक स्तरातून नेते, बॉलिवूड सेलेब्स तसेच सामान्य नागरिक प्रतिक्रिया देत आहे. अशातच या विधेयकावर भूमाता ब्रिगेड अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे.
तिहेरी तलाकच्या विधेयकाला पाठिंबा दर्शविताना त्या म्हणाल्या की,’तिहेरी तलाक याबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे होते, या विधेयकाच्या मंजुरीमुळे मुस्लिम महिलांवरील अन्याय होणे बंद होईल. यामुळे २९ जुलै हा दिवस मुस्लिम महिलांसाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. आता लवकरच भारतामध्ये बुरखा बंदी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, तिहेरी तलाक पद्धतीवर 22 देशांनी बंदी घातली आहे. या विधयेकास अनेक चर्चेनंतर मंजुरी मिळाली असून या विधेयकाचा विरोधी पक्षाकडून विरोध केला जात आहे.